जालना जिल्हा देवालयासाठी प्रसिध्द असुन राजुर ता. भोकरदन येथील गणपतीचे मंदीर , अन्वा ता. भोकरदन येथील माहेश्वराचे मंदिर आणि अंबड येथील मत्सोदरी देवीचे मंदिर तसेच नेर ता. जालना येथील वटेश्वराचे मंदिर , परतुर येथील नरसिंहाचे मंदिर , जालना शहरातील भैरवनाथाचे मंदिर, गणपती मंदिर, राम मंदिर, महानुभाव व जैन मंदिर देखिल प्रसिध्द आहे. तसेच जालना शहराच्या मध्यभागी जनार्धन मामांचा पुतळा आहे तसेच नागेवाडी येथील नालंदा बुध्द विहार प्रसिध्द आहे.
1. समर्थ रामदास स्वामी :- समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथे झाला. त्यांनी मनाचे श्लोक व दासबोध हे ग्रंथ लिहले आहेत. त्यांनी लोकांना देशाभिमानाची शिकवण दिली.
2. आनंदी स्वामी :- येथे आनंदी स्वामी नावाचे थोर संत होऊन गेले ते सर्वांशी समानतेने वागत. गरीबांना मदत करीत , जालना येथे त्यांची समाधी आहे.
3. जानअली व बाबाअली शहा :- जानअली व बाबाअली शहा हे संत देखिल याच जिल्ह्यात होऊन गेलेत. जालना शहरात त्यांचे दर्गे आहेत. व तेथे दरवर्षी उरुस भरतो.
4. राजुर :- भोकरदन तालुक्यातील राजुर येथे गणपतीचे मंदीर असुन संपुर्ण देशभरातुन मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनास येतात.
समर्थ रामदास स्वामी
आनंदी स्वामी
राजुर